नवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त
राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांच्यासमोर असलेला माइक तोडण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सभापती व्यंकय्या नायडू यांनी 8 ही खासदारांना सात दिवसांसाठी निलंबित केले.
यानंतर सर्वच विरोधी पक्षांनी कामकाजावर बहिष्कार टाकला असून गेल्या तीन दिवसांपासून संसद भवन परिसर आंदोलन सुरू आहे. त्यानंतर त्या खासदारांनी सोमवारी रात्रभर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ मुक्काम ठोकला होता. त्यानंतर आज सर्व खासदारांनी महात्मा गांधी पुतळ्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढला.
#WATCH: MPs of Opposition parties march in Parliament premises in protest over farm bills. Placards of ‘Save Farmers’ & ‘Save Farmers, Save Workers, Save Democracy’ seen.
Congress’ Ghulam Nabi Azad, TMC’s Derek O’Brien, and Samajwadi Party’s Jaya Bachchan present, among others. pic.twitter.com/PIIxqciFpG
— ANI (@ANI) September 23, 2020
शेतकऱ्यावर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही. शेतकरी विरोधी मोदी सरकारच्या विरोधात आमचा लढा असाच सुरूच राहील. बळीराजाला भांडवलदारांच्या स्वाधीन करण्याच्या मोदी सरकारचा डाव आम्ही हाणून पाडू, अशी प्रतिक्रिया विरोधी खासदारांनी व्यक्त केलीय. अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे.