मुंबई :रायगड माझा
वांद्र्यातील शासकीय वसाहतीतला मराठी माणूस इथेच राहील, सरकारने इथल्या माणसांना बाहेर काढून दाखवावं, असं आव्हान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपला केलं आहे. मुंबईतील वाद्र्यांत ते बोलत होते.
परप्रांतीयांसाठी मराठी माणसाला डावललं जातंय, प्रत्येक राज्यात त्यांच्या माणसांचा पहिल्यांदा विचार केला जातो, असंही ते म्हणाले.
तसंच तुम्हांला कोणीही इथून काढणार नाही तुम्ही इथंच निश्चित राहावं, असं आश्वासन राज ठाकरेंनी शासकीय वसाहतीतल्या मराठी माणसांना दिलं.
शेयर करा